Tuesday 22 November 2011

चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥


चालावा जगाचा प्रवाह। व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह। 
यासाठीच योजिता विवाह। धर्मज्ञांनी तयांचा॥

स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधांबाबत जगातील विचारवंतांनी खूप उहापोह केला आहे. त्यात विवाह ही संस्था खूप चर्चिली
गेली आहे. याचा खरच उपयोग आहे? असल्यास काय? विवाह हे केवळ एक लोंढे आहे. एक अशी संस्था ज्यातून कायदेशीर आणि समाजाला रुचेल अशा पद्धतीने मैथुन साधता येते असा एक युक्तिवाद आहे. याउलट विवाहाचे बंध थेट स्वर्गात तयार होतात असाही एक युक्तिवाद आहे. तुकडोजी महाराज म्हणतात स्त्री पुरुष हे दोन चाके जर परस्पर सहाय्यता करीत असतील तरच संसार-रथ 'कौतुके' चालेल आणि आदर्श ग्राम अथवा समाज
निर्मान होईल. मात्र झाले आहे भलतेच. या व्यवस्थेची हेळसांड झाली आहे, विवाहाची रुढीच बनली आणि यातून समाजात हजारो दु:खे जन्माला आली. महाराजांचा काळ पाहता हा विचार खूप आधुनिक म्हणावा लागेल. आजही हा विचार समाजातील किती लोकांना पटेल? विवाह कशासाठीतर जग प्रवाही असावे आणि निसर्गगुणांचा निर्वाह व्हावा यासाठी. जग प्रवाही असणे म्हणजे काय? याचा आपल्या समाजाच्या संरचनेवर
काय परिणाम होईल? खरोखरच आपला समाज 'प्रवाही' आहे असे म्हणता येईल काय

No comments:

Post a Comment