Tuesday 22 November 2011

यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय। त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥


यासाठी एकचि उपाय। आपण न ठेवावे अलग ठाय।
त्यांच्यात जावे मिळोनि निर्भय। समुदाय साधाया॥

भारतीय समाज म्हणजे अनेक संप्रदाय, विचारसरणी, पूजा पद्द्यती, आदर्शांची रेलचेल. त्यांतून संघर्ष निर्माण होत असतात. हे जोपर्यंत
एक होत नाहीत तोपर्यंत संघटन कसे व्यायचे? तर तुकडोजी महाराज म्हणतात याची सुरुवात आपल्या स्वत:पासून केली पाहिजे. आपणच जर वैविध्याचा तिरस्कार केला, आपले आणि परके मानले, जे वेगळे आहे त्याचे भय मानले तर संघटन होणार कसे? म्हणून एकमेव उपाय हा कि आपण वैविध्याचे भय न मानता त्याचे कौतुक करणे, त्यात सम्मिलित होणे आणि सरते शेवटी समुदाय म्हणजेच संघटन साधणे. हा विचार माध्यमांतून
होतांना दिसतो काय? पत्रकार वैविध्याचे कौतुक करतांना दिसतात, त्यात सहभागी होऊन त्यातील वैशिष्ट्ये दाखवतांना दिसतात काय कि केवळ एक दुसर्‍यातील फरक दाखवतात?

No comments:

Post a Comment